रविवार, २२ एप्रिल, २०१२

अवेळीच केव्हां दाटला अंधार..



अवेळीच केव्हां दाटला अंधार..
तिच्या गळा जड झाले काळेसर..

एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले..
हासताना नभ कळुन  गेलेले.....


पुन्हा मी पाहिले तिला अंगभर..
तिच्या काचोळीला चांदन्याचा जर..
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार....


कितिक दिसानी पुन्हा ती भेटली..
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली....

तिच्या डोळीयात जरा मी पाहिले..
काजळात चंद्र  बुडुन गेलेले....


  - सुधीर फडकेंच्या अल्बम मधील त्यांच्याच आवाजात नटलेले ना. धों. मनोहर यांचे हे भावगीत

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

परत सुरुवात...

एकदाचा मुहुर्त सापडला.. अहो लग्नाचा वगैरे नाही हो, तब्बल ५ वर्षानंतर परत ब्लॉग लिहिण्याचा!!

तर सांगायचेच म्हटले तर ह्या ५ वर्षात बरेच पाणी पुलाखालुन वाहुन गेले आहे.. आता हा पुल कोणता? पाणी पुलाखालुनच का वाहुन गेले? ते पाणीच होते का? असं कसं पाणी पुलाखालुन जाउ दिला? पाणी काय फुक्कट मिळते का? असं काहीतरी विचारत बसु नका..काय?

आता ठरवलं तर आहेच.. जितके काय ते पाणी वाहुन गेले आहे त्याचा हिशोब इथुन पुढच्या ब्लॉगपोस्ट्स मध्ये मांडायचा!

चला सुरुवात तर झालीच आहे, आता 'आलिये भोगासी असावे सादर' म्हणुन इथुन पुढे  निमुटपणाने वाचत रहावे :) म्हणजे अगदी काही गप्पच राहु नका..अधुन मधुन कॉमेंट्सच्या स्वरुपात पुश्पगुछ: आणि शिव्यांच्या लाखोल्या देखिल वाहू शकता.. :)

चला भेटू परत!



सोमवार, २४ सप्टेंबर, २००७

संतुसाठी मुलगी पाहिली.....

तशी मुंबई वरुन निघण्याआधीच सगळी तयारी केली होती(जय्यत!)। नवा ड्रेस!! cool! आणि जर सगळं काही व्यवस्थित जमलंच तर साखरपुडा पण आटपायचा असा माझा हेका होता(पोरगं वयात आलय ना! मी नव्हे... आमचा संतोष, संतुदादा...). सुट्टी तर अगदी दोन दिवसाची मिळाली होती, संतुचे काही ठरलेच तर साखरपुडा करायचाच .. आणि त्या नावावर आणखी एका दिवसाची सुट्टी काढायची असा माझा प्रामाणिक बेत!

भल्या पहाटे संकेश्वर मध्ये आमचे आगमन... मग गडहिंग्लजला प्रयाण॥ आणि माझे माझ्या गावी मु। लिंगनुर पो. मुंगुरवाडी ला प्रस्थान... घरी "श्रीं" चे आगमन माझ्याआधीच झालेले.. मस्तपैकी फ्रेश होउन, आरती वगैरे आटपुन संतुच्या घरी दाखल!! एका दिवसात ३ मुली पहायच्या होत्या. सकाळी उत्तुर..नंतर गडहिंग्लज, मग ऐनापुर असा बेत ठरला. पैकी उत्तुरला संतुची मावशी असल्यामुळे फक्त आम्ही दोघानीच तिकडे मुलगी बघण्यासाठी जायचे असे ठरले.

दुसर्या दिवशी ९ वाजता आम्ही गडहिंग्लज वरुन निघालो, उत्तुरमध्ये पोहचेपर्यंत आम्ही "मुलगी" या विषयावर आणि ती आमच्याप्रमाणे कशी असावी, कशी नसावी ह्यावर बरीच निश्फळ चर्चा केली। output काय?? कोण पदरात पडेल तीच छान ना!


मावशींच्याकडे पोहचल्यानंतर काकांनी मुलीच्या घरी फोन करुन सांगितले, "पाहुणे आलेत..", ... "हो..हो हो..".... "मुलगा... आणि त्यांचा मित्र "... "बर...". मुलगीच्या घरी आम्ही आल्याची कल्पना देउन आम्ही वाट पाहत बसलो.

मुलगी बी।एड. करत आहे. मुलींच्या घरचे म्हणतात की मुलगी नोकरी करणार. त्यातल्या त्यात 'एकतर लग्नानंतर मुलग्याकडच्यानी मुलगीला नोकरी लावायची नाहीतर आम्ही नोकरी लावतो . मगच लग्न' असं कांहीबाही आहे मुलीकडच्यांचं असं समजलं. मला तर काहीतरी वेगळेच वाटु लागले..."आयला! नोकरी" ... एकतर आमचा संतु साधाभोळा॥ त्यात मुलगी नोकरी करणार.. मग काय उदंडच ( पण , सध्या संतुची 'पत' वाढलीये म्हणे) "काय काय आहे ते तुम्हीच विचारायचे... लाजायचे नाही ", इती काकाश्री. संतु तर अगदी कुठे TCS च्या interview ला ऍपीयर होणार आहे असंच तोंड करुन बसला होता. मी पण विनाकारण घाबरत होतो. मुलगीला काय काय विचारायचे... नाव विचार... मग डीग्री कुठली... कुठले कॉलेज.. स्पेशल विशय कोणता ते विचार... हे सर्व मीच त्याला सुचवत होतो. "Be Brave बघायचे नाहीतर आहेच की ... पुढची..." हा माझा सरळ साधा विचार!!


तोपर्यंत मुलीच्या घरुन "या" म्हणुन बोलावणे आले। संतु, संतुचे काकाश्री, मामाश्री,ओळखीचे एक गृहस्थ आणि सगळ्यात लहान असा 'मी' मुलीच्या घरी आलो. समोरच्या गल्लीतच मुलगीचे घर असल्याकारणाने प्रवास हा प्रकार काही करावा लागला नाही.


एकापेक्श्या एक हात पाणी घ्या म्हनुन पुढे आले॥ त्यपैकीच एका हातातील तांब्या घेउन पायावर पाणी घेतले.. मी मुद्दामच वेळ करत होतो... सगळ्यात शेवटी घरात प्रवेश केला...


संतुच्या बाजुच्याच खुर्चीवर थोडासा तिरका होउन बसलो। आख्खी खोली मानसांनी भरली होती. सर्वजन अगदी .. आजोबा लोक.


काकश्रीनी, "हा मुलगा॥" अशी संतुची ओळख करुन दिली। सगळे डोळे भरुन भरुन संतुकडे पाहत होते. समोरच्या चौकटीवर दोन लहान मुले ...' हे एकंदरीत काय चाललय ' ह्याचा आंदाज घेत होती. बाजुच्याच चौकटीतुन आतील बायका.. हळुच डोकावुन नवरा मुलगा कसा आहे हे पाहत होत्या...

"मुंबईमध्ये कोणत्या कंपनीत असता आपण" .. कोठुन तरी प्रश्न आला ..
"रिलायंन्स मध्ये " , इति संतु। "काय काम करता आपण ॥" "मी सॉफ्ट्वेअर इक्झीक्युटीव्ह म्हणुन काम करतो तिथे.." इती संतु. "शिक्शण काय झालय .." "बी. कॉम. ..नंतर मग मी दोन वर्षे महालक्श्मी कॉम्पुटर्स मध्ये लेक्चरर म्हणुन काम केले. नंतर मग पुण्यात 'जावा' ची certification exam दिली.. ती exam म्हणजे ग्लोबल exam असते म्हणजे महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती exam नसते.. ग्लोबल असते. ती exam दिली. नंतर पुण्यात ६ महिने काम केले.. नंतर आता Reliance मध्ये डाटाबेस(?) मध्ये काम करतो " संतुचा तोंड्पट्टा.

समोरचे काही अगदी, जावा, एस्क्युल मध्ये P.hD. केलेले लोक आहेत असच वाटलं असावं कदाचीत संतुला.

तोपर्यंत आतुन दोन आज्या आल्या... मुलगा कोनता ते पहायचं होतं त्याना.. "हा .. इथं इथं ..हाच मुलगा" ..दोघीपण अगदी टक लावुन संतुकडे बघितल्या... "हं..छान आहे हो"

आजी लोक मुलग्याला बघत आहेत हे पाहण्यासाठी दोन्ही चौकटीना एकदम गर्दी झाली.. प्रत्येकालाच मुलगा म्हणजे नेमका काय प्रकार असतो ते बघायची घाई लागली असावी कदाचित!


* * *

आजी लोक आत मध्ये गेल्यानंतर परत प्रश्न आला "तर डेटाबेस मध्ये काम करता आपण.." पाहुण्यानी कोनत्यातरी शिक्षकालाच मुलग्याविषयी जाणुन घेण्यासाठी आणले होते

"हो डेटाबेस मध्ये करतो.. म्हणजे क्युरीज वगैरे...मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर २००५ मध्ये काम करतो...." परत संतु चालु झाला.... एव्हाना तो मास्तर पाव्हणा गार झाला होता.. कदाचित जरा जास्तच लक्षात आलं असावं त्याच्या.

मग मुलगी बाहेर येण्याची कुजबुज झाली। "इथे . . समोर बसुदेत..चालेल.."

'मुलगी' आली... समोर खुर्चीवर अगदी सावरुन बसली। परत एकदा दोन्ही चौकटी खचाखच भरल्या। मघाच्या आज्या पण आत येउन बसल्या. मग सगळं काही शांत झालं. चौकटीतुन सर्व बायका संतुकडे बघत होत्या... लहान मुले पण अगदी पुजेला बसल्यासारखी संतुकडे टक लावुन पाहत होती. संतुच्या काकानी शांतता भंग करत "विचारुन घ्या काय विचारायचं ते...." म्हणुन टाकले.

परत शांतता...

परत सर्वांचे लक्ष संतुकडे लागले।

"नाव कसे आपले....." , संतु विचारता झाला...

"माझे नाव, . . . . . . . . . . .  , मी सध्या बी. एड. करते", मुलगीने संतुकडे तिरकी नजर टाकत उत्तर दिले.

"बी. एड. कुठल्या कॉलेजमधुन", इती संतु.

"के। डी. शिंदे कॉलेज, गडहिंग्लज..."

थोडी शांतता....

"qualification काय आपले?(संतु Basic शब्द विसरला होता)" , संतुने विचारले

मला पण समजले नाही की हा काय विचारतोय

"तेच ना... बी. एड...." मुलगी नटक्या रागात बोलली... नटकाच का असतो राग ते मला तेंव्हा समजले।

"Basic Qualification म्हणजे त्याआधी काय केलेय.. बी. कॉम. की...." , इती संतु.

"बी.ए।"

"स्पेशल विषय कोणता होता"

"मराठी..."

संतुच्या प्रश्नाना पुर्णविराम. सगळीकडे शांतता झाली.

कितीतरी वेळ शांतता ... आणि शांतता.... बाकी काही नाही. काहीतरी वेगळेच वाटु लागले. इतकी वयस्कर लोक असुन देखील कोणीही काहीच बोलेना...

लक्ष संतु पुढचा प्रश्न काय करणार ह्याकडेच होते. पण काही केल्या संतुला काय विचारावं ते सुचेना. तोपर्यंत कुजबुज सुरु झाली. मग मीच संतुला हळुच सुचविले "कॉम्पुटर वगैरे काही केले आहे का विचार..."

"कॉम्पुटरचा कोनता कोर्स वगैरे केलाय का" , इती संतु

"MSCIT... "

"कोठुन॥means कोणत्या instituteमधुन" संतुला बहुतेक तेच महत्वाचे वाटले असावे।

"इथुनच की... उत्तुरमधुन"

आणखी परत एकदा शांतता पसरली. मला पण काही सुचेना.. काय विचारायचं.... बराच वेळ गेला... मग मुलीचे वडील पुढे होउन बोलले. "तुमचे विचारुन झाले असेल तर मुलगी आत जाउदे क..."

संतु लगेच म्हणाला " हो.. हो... झाले"।

मुलगी उठु लागली तोवर त्या आजींनी परत तिथेच बसायला सांगितले. मग थोडे थोडे इतर बोलणे होउ लागले. मुलगीला ५-७ जणीनी खणानारळाची ओटी भरली. यादरम्यान संतु... आणि मुलगी यांनी.. "हाच का... " "हीच का.." असं म्हणत चोरटया नजरेने एकमेकांना पाहुन घेतले.

मुलगी आत गेली. पाठोपाठ पोहे (!!!) पाठोपाठ चहा आला...आणि झाला पण..

"म्हैस कीतीला दिलास...." पैकी आज्जे लोकांना ते जानुन घेण्यात रस होता वाटतं. चहा घेता घेता त्यांच्यात चर्च्या चालु झाली.

"धा ला "...

"उगीचपण म्हटलं... नंतर आणि कुठं विकत बसायचं .. म्हणुन दिउन टाकली..."

"गावड्याची एक म्हस हाय बघ ... चांगली.."

"आता कुठं म्हशी घीत बसत्यासां... गवतं तरी कुठं हाईत घेवा..."

बरं असतं ह्या आजे लोकांचे... आपणच नाहीती चिंता करत बसतो.... IT चे भवितव्य काय? Saturation होणार का?... त्या आजे लोकांना ह्याबद्दल तसुभरही चिंता नसेल ना..??????

गवतं...म्हशी...गोठा....शेत आणि पाउस ह्याभोवतीच त्यांचे विश्व... छानच असतं ते देखील

* * *

मग मुलगीच्या वडिलानी संतुला विचारले.. "नाव कसे आपले॥???"

"मी संतोष लक्ष्मण नार्वेकर, मी रिलांयन्स मध्ये कामाला आहे." इति संतु

"शिक्षण ?"

"मी बी.कॉम. केलय.. नंतर........." संतुने परत एकदा सर्व काय ते सांगुन टाकले.... जावा... डेटाबेस.. ग्लोबल एक्झाम... ...
कोनीतरी संतुच्या हाती वही आणुन दिली. "तुमची माहीती आणि कंपनीचा पत्ता वगैरे लिहुन द्या"

मी ती वही घेउन लिहणार तोवर त्यांचा मुलगा पुढे होउन म्हणाला .." त्यांच्याच अक्षरात लिहुन द्या.." तो बहुतेक संतुचा होणारा मेव्हणा असावा.

संतुने ती वही घेउन .. आपली माहिती खरडुन काढली( खरडुनच म्हणायला हवी... लिहीली असं काही त्याला म्हणता येणार नाही!!!!)

परत बाकीचे लोक एकमेकांत बोलल्यानंतर संतुने काकांना सुचवले... "निघुयात ..."
मग सर्वांचा निरोप घेउन आम्ही घराबाहेर पडलो.
मावशींच्या घरी येउन पाणी घेतले व गाडीला kick मारली...

गडहिंग्लज येइपर्यंत.. मी संतुची त्याने वहीत खरडलेल्या गोष्टीवरुन बरीच खरडली...

मुलगी छान आहे...संतुने तिला फारच मनात घेतले असल्यामुळे आम्ही कांही दुसर्या मुली पाहिल्याच नाही...

अजुन तरी मुलींच्याकडचा होकार Status Pending दाखवतोय... बघु काय होतय ते.

मंगळवार, ११ सप्टेंबर, २००७

पराक्रम

कपडे धुणे.....


जगातील सगळ्यात कंटाळवाणे काम! आता हा विचार करु नका की , हा नेमका कपडे धुवायच्या कामाला आहे की काय(?)। एखाद्या बॅचलर मुलग्याला पकडा आणि विचारा... समजेल. मीन्स, अगदी अलंकारीक शब्द (च्या....,इ..., उ... वगैरे) वापरुन समजुन सांगेल की कपडे धुणे(अर्थात स्वत:चे कपडे बरं का! लग्न झालेल्यांचे काही वेगळे अनुभव असु शकतील(?) ) म्हणजे काय असतं ते. कांही बॅचलरना आवडत देखील असेल(!)


रोज संध्याकाळी रुमवर परतल्यानंतर पहिला प्रश्न मनात येतो, उद्या कोणता ड्रेस ?? सगळेच कपडे मळलेत? मग! कंटाळा तर आलाय॥ आता धुवायचे का कपडे... नको... झोप पण येतेय... नकोच.. मग त्यातल्या त्यात कमी(?) मळका ड्रेस उद्यासाठी निवडायचा ...(सुटकेचा निश्वास टाकायचा... हु.. जीवावर येतेय हो कपडे धुणे!!!) , आणि झोपी जायचे , सकाळी उठल्यानंतर एक तरी ड्रेस भिजवत ठेवायचा दृढ(?) निश्चय करुन!


रात्री स्वप्नात (?) नको सांगायलाच नको... सगळा कपडांचा ढीग आणि मी एकटाच बिचारा त्यांच्याशी कब्बड्डी (की कुस्ती!) खेळतोय। अर्थात हा स्वप्नाचा भाग आहे. पण निश्चितच मनाची तयारी तरी होते. उद्या चक्क एक ड्रेस धुणार आहे गिरीश!


सकाळी महत्प्रयासाने एका ड्रेसला एरीयल मध्ये भिजायला घातले जाते। बिचारा दिवसभर मनसोक्तपणे डुंबुन घेतो सुगंधी(?) पाण्यात... आता आजचा दिवस की परत रात्र तिथेच घालवायची आहे ते त्याला माहीत नसते.


मग ऑफिस मध्ये आल्यानंतर मधुन मधुन मला रुमवर जाउन कपडे धुवायची आहेत हे आठवुन अगदी एखाद्या नवख्या नवरीला जशी घरची आठवण यावी तसे भरुन भरुन (भरभरुन म्हटलं तरी चालेल) येते.
कॉफी वगैरे घ्यायला गेल्यानंतर कपडे धुणे म्हणजे कीती कंटाळा असतो त्याची खमंग(?) चर्चा केली जाते। मनाची तयारी करतो हो॥ संध्याकाळी चक्क एक ड्रेस धुवायचाय ना गिरीशला!.



जशी संध्याकाळ होउ लागते, परत परत आठवु लागते ... कपडे धुवायचेत!! एकदम अस्वस्थ वाटु लागते... नकोच... आज ड्रेस धुवु की नको॥ की नवा शर्टच घेउ(!) ... जाउदे .. रुमवर गेल्यानंतर बघु।


एरवी रुमवर जायला उत्सुक असणारा गिरीश आज हिरमुसलेला असतो. हा हा... बिच्चारा!!
सकाळपासुन माझी अगदी मन लावुन वाट पाहणारा (की लावणारा) माझा ड्रेस देखील अगदी करुणापुर्वक नजर माझ्यावर टाकतो... मनातल्या मनात म्हणत असेल... "धुतय वाटतं आज!" हा हा..



अगदी निश्चयाने तो ड्रेस पाण्यातुन बाहेर काढला जातो, बरीचशी मारामारी केली जाते त्याचाबरोबर॥ च्या मारी(ल इ तरास झालाय).. मग कपडे धुताना पहिल्यांदा आईची फार आठवण येते... मग छोट्या भगिनी आठवतात... इथे असत्या तर कपडे धुउन दिल्या असत्या नी (काय मुलगा आहे ना... कामापुरता आठवण काढतो!)


मग वाटते .. आयला .. माझी डार्लिंगच इथे असती तर... मस्तपैकी कपडे धुवुन , प्रेस करुन तयार ठेवली असती ..( की मलाच तिचे कपडे धुवायला लावली असती काय माहित!! अनुभवी लोक काहीतरी सांगु शकतील का??) च्या मारी(ही कोन?) .. लवकरच लग्न केले पाहिजेत हा निश्चय करुन ड्रेस पिळला जातो...
आणि मग ड्रेस वाळत टाकताना .. संतोशला (माझा मित्र ..रुममेट ) माझा दोहोंचे चार करण्याचा निर्णय सांगितला जातो.. ते बिच्चारं हसतंय... !!



त्याला काय माहित.. कित्ती कित्ती मोठा पराक्रम केलाय गिरीशने आज... चक्क एक ड्रेस धुतलाय!!!


शुक्रवार, ७ सप्टेंबर, २००७

फोन फोन!

काय सांगु आशी ,

ऑफिसमध्ये येतोय न येतोय तोवर २-३ वेळा ऍशचा मिसकॉल आलेला असतो.

परत मोबाइल ऍश कॉलींग चा मेसेज दाखवु लागतो. घाबरु नको.. अणि गोड गैरसमज पण नको, ऍश .. माझी मैत्रीण.. जराशी बर्यापैकी आशीच.

बोलणे तर बघशील...

मी "हॅलो.."
तिकडुन "हं...." (आता हं म्हणजे काय?)

मी "बोल ना......"
तिकडुन "हं..." (किटकिटच आहे)

मी.. "आशी...... बोल ना...."
तिकडुन "काय..?? "

मी.. "काय म्हणजे..?? "
परत मीच .." काय करतेस (आशी म्हशी)?"
तिकडुन "गप्पे.... (ठणाणा...)"

तिकडुन " काल्या..... तु ना... "
मी "काय .. मी काय?"

तिकडुन "तुला काय वाटतं की नाही... "
मग मी "... मला कसं काय वाटेल .. जे वाटायचं ते ... आम्याला वाटायला हवं ना..."
तिकडुन " गप्पे ...काल्या नाला..? (परत ठणाणा) "

मग मी " म्हशी... मग , त्यालाच वाटायला हवे ना... मला वाटुन कसं चालेल.. "
तिकडुन "सांगु का संपदाला..."
मी "(अक्चुअली बोलती बंद व्हायला हवी) सांग ना... नो प्रोब्लेम .."

तिकडुन "हो हो हो... कामे कर.. Reliance ला बुडवायचा विचार आहे की काय?"
मी "at least कॉग्नीझंट वाल्यांच्यासारखा तर नाही... ही, ही, ही (हे हसणं.. जरा विचित्रच वाटतंय नी!) ऑन डी बेंच .. बिनकामाचे एम्प्लॉइज.."


तिकडुन " असुदेत काल्या मला माहितेय किती काम करतोस तु ..(सपशेल हार ) "
मी "मग!!! नवरा काय म्हणतो... कॉल केलेलीस का? "


तिकडुन " सगळे सारखेच!!(जर त्यांच्यात भांडाभांडी झाली असेल तर ) मग... सकाळीच केला..(ह्याचा अर्थ सगळं ठिक आहे म्हणायचं) .. तो तर ना फार कामात आहे बिचारा... (आज जरा जास्तच उतू चाललय ...) .. (हसुन) आत्ताच भांडुन ठेवलाय (म्हणजे हीनेच भांडणे काढलेत आणि त्याने ठीक आहे घे म्हटलाय!! )"

मग मी "बर..."
(ह्याचा अर्थ हा.. की मी समोर काहीतरी काम करतोय .. इम्पॉर्टंट तेच...


मग तिकडुन " काल्या ... काम कर... उगाच पण मला फोन लावायचा आणि बर .बर .करत बसायचं..."

मग मी.. " म्हशी.... मी फोन लावलाय तुला काय करायचंय .. ?? "

मग मीच " चल बाय .. "

लगेच तिकडुन "आय ..काय झालं(म्हणजे काय ? )"

मग मीच " आजपासुन मी तुला फोन करणार नाही आणि तु पण मला फोन करु नकोस ..
समजलीस...?"


धाड...!!(एकदाच ऐकु येते.. )


मग आणखी थोड्यावेळाने...


ऍश कॉलींग...

मग मी "हं..." :)

सोमवार, ३० जुलै, २००७

नवा शोध

वासरात शहाणी गाय लंगडी...

कसे सरतील सये....

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे,
सरताना आणि सांग सलतील ना...
गुलाबाची फुले दोन, रोज राती डोळ्यावर..
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना. .. भरतील ना...

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा..
रिते रिते मन तुझे उरे..
पोटभर हसे हसे , उरातुन वेडे पिसे ..
फुल..फुल कुनात झुरे...
आता जरा अळीमेळी, तुझी माझी व्यथा निरी..
सोसताना सुखावुन हसशील ना....


कोण तुझ्या शोधातुन , उभे असे सामसुम..
चिडिचुप सुनसान दिवा..
आता सांग ढळेलच अणि पुन्हा छळेलच..
नभातुन गोरा चांदवा..
चांदन्याचे कोटी कण, आठवांचे ओले सण...
रोज रोज निजभर भरतील ना...

येथे दूर देशी , माझ्या सुन्या खिडकिच्या पाशी..
झडे सर काचभर तडा...
तुच तुच, तुझ्या तुझ्या, तुझी तुझी, तुझे तुझे..
सारा सारा तुझा तुझा सडा....
पडे माझ्या वाटेतुन आणि मग काट्यातुन जातानाही पायभर मखमल ना...


आता नाही बोलायचे, जरा जरा जगायचे..
माळुनिया अबोलीची फुले...
देहभर हलुदेत, विजेवर झुलुदेत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले..
जरा घन झुरु दे ना, वारा गुदमुरु दे ना, तेव्हा नभ धरा सारी भिजवेल ना......

गुलाबाची फुले दोन , रोज राती डोळ्यावर ...
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना.. भरतील ना..